विनयभंगासासारख्या घटनांबाबत पुरेशी संवदेनशीलता दाखवली जात नाही का?

July 14, 2012 4:38 PM0 comments

14 जुलै

सोमवारी गुवाहाटीमध्ये एका कॉलेजवयीन मुलीचा 20 पुरुषांच्या झुंडीने सर्वांदेखत विनयभंग केला आणि या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहे. पुन्हा यासाठी म्हणतेय कारण, याआधी देखील हेच प्रश्न निर्माण झाले होते. नऊ महिन्यांपूर्वी मुंबईतल्या रुबेन आणि किनन हत्याप्रकरणानंतर हेच प्रश्न पुढे आले होते. पण परिस्थिती जैसे थेच आहे. यावरच हा आजचा सवाल..'विनयभंगासासारख्या घटनांबाबत पुरेशी संवदेनशीलता दाखवली जात नाही का?' याविषयावर विश्लेषण करण्यासाठी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे, इंटिलिजिन्सचे माजी ऍडशिनल डेप्युटी कमिशनर शिरीष इनामदार, 'मावा' या सामाजिक संस्थेचे मानद सचिव हरिष सदानी, ऍड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवसरा आणि किननचे वडील वॅलेरियन सॅन्टोस सहभागी होते.